अन पुन्हा माणूसकी भेटली.
लहानपणापासून शिकत आलो माणूसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे.. प्रत्येकाने दुसऱ्याशी चांगलेच वागावे.. फार नाही तर निदान आपल्याला जमेल तेवढी मदत गरजूला करावी. कोणाला फसवू नये. तरी कधीकधी लोकांचा मानवतेवरचा विश्वास काहीप्रमाणात कमी होताना दिसत असला तरी संपलेला नाही. काळ बदलत गेला तसा मानवाचे रंग बदलत गेले. स्वतःच्या स्वार्थासाठी मानवाला नाती, माणूसकी ह्या सर्व गोष्टी नगण्य वाटू लागल्या. काही प्रमाणात स्वार्थ हा सर्वात मोठा ठरताना दिसतो. आजचा काळ तर ह्या सर्वाची प्रचिती देणारा असला तरी माणुसकी पूर्णतः नष्ट झाली असं म्हणता येणार नाही. आजच घडलेला अनुभव... ११ ची वेळ.. (अर्थात सद्यस्थितीत रेल्वेच्या नियमावलीनुसार) सकाळी कामावर जाताना मुंबईकर जसा नेहमी घाईतच असतो; तशी मीही काहीशी घाईतच होते.. ट्रेन मध्ये चढतानाचा अलिखित नियम मुंबईकरांना सवयीचाच आहे. तो म्हणजे स्वतःला आणि सोबतच्या सामानाला नीट सांभाळायचं. आपली बॅग पुढे पकडूनच ट्रेनमध्ये चढायच...